Tuesday, April 22, 2008

भय इथले संपत नाही...

भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकाविली गीते

हे झरे चंद्रसजणांचे
ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण
झाडांत पुन्हा उगावाया

त्या वेली नाज़ुक भोळ्या
वारयाला हसवुन पळती
क्षितिजांचे तोरण घेऊन
दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा
आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील
जणू अंगी राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही
तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळापाशी
मी उरला सुरला थेंब

संध्येतील कमल फुलासम
मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण
घालती निळाईत राने

स्तोत्रात इंद्रिये अवघी
गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही
चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते
की परतायाची ghaaee
मेंदूतुन ढळली माझ्या
निष्पर्ण तरुंची राई
-कवि ग्रेस

ही माझी अत्यन्त आवडती कविता. काल पासून ही कविता सतत डोक्यात घोळते आहे.

8 प्रतिसाद:

Meghana Bhuskute said...

काय योगायोग! कालपासून माणसाची काढावी तशी या कवितेची आठवण काढत होते. कसे आभार मानावेत काही कळतच नाही...

Anand Sarolkar said...

@ Meghna: Aabhar kasle...just enjoy :)

नंदन said...

!

नंदन said...

(ajoon kay lihava suchala nahi...)

Anand Sarolkar said...

Khara tar ya kavitechya oli sadhyachya paristhitila agdi chapkhal bastat...manatla sagla kagcavar utaravta yeilach hyachi shashwati nahi mhanun fakt kavitach.

mimo said...

Mala tar hi kavita pharach avadate

Pratik said...

कसे आभार मानावेत हे कळत नाही ...फार दिवसापासून कविता शोधत होतो.....महाश्वेता मालिकेत वापरली होती......

Anand Sarolkar said...

@mimo: :)

@pratik: my pleasure! Mahashweta madhe jeva aikli hoti teva mahit navhta ki hi kavita he mhanun :)